Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन

प्रारंभिक परिचय               भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे. शिक्षण             डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.  हरित क्रांतीची गरज का पडली ?  १). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६...

PM Kisan योजना सरकार बंद करणार ?

PM Kisan PM Kisan योजना सरकार बंद करणार ?          केंद्र सरकार pm kisan योजने अंतर्गत शेतकऱ्यांना  वर्षाला तीन टप्प्यात ६००० रुपये देते. पण लोकसभा निवडणुकी नंतर या योजनेत बदल होतील किंवा योजनाच बंद करण्यात येईल अश्या चर्चना उधाण आले आहे. PM Kisan या योजनेतून शेतकऱ्यांच्या मनात मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचे सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.             शेतकऱ्यांच्या मुद्दा आला की, सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री सर्वजण या योजनेचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. PM Kisan बंद होण्याची चर्चा का ?               PM Kisan योजना सरकार बंद करणार ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे नीती आयोग आहे. नीती आयोगाने देशातील pm kisan योजनेस पात्र शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.             केंद्रीय नीती आयोग या योजनेचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला हे तपासत आहे. खालील गो...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...

समाज माध्यमांचा विळखा आणि आपण Quit Social Media

Why Quit Social Media ? समाज माध्यमांचा विळखा आणि आपण                 आजच्या जगात, समाज माध्यमांनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे, मग ते २ वर्षांचे मूल असो किंवा ६० वर्षांचा वृद्ध व्यक्ती. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ज्याशिवाय लोक आपला दिवस घालवू शकत नाही. एखादे मूल रडत असले तरी, रडणे थांबवण्यासाठी कोणीतरी त्यांना मजेदार व्हिडिओ मोबाईल वर लावून देतो. मग, समाज माध्यम म्हणजे काय ? हे विविध तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे जे जगभरातील लोकांना माहिती, कल्पना आणि निर्मिती सामायिक करण्यात मदत करते. पण मग प्रश्न पडतो की त्याचे अनेक फायदे असले तरी ते लोकांच्या आरोग्यासाठी चांगले आहे का ? आणि त्याचे व्यसन लोकांना कसे लागत आहे ? हे आपण या लेखातून पाहणार आहोत.                     लोकांना मोबाईल स्क्रीनशी खिळवून ठेवण्यासाठी अनेक मोठ मोठ्या समाज माध्यम कंपन्या लक्ष अभियंता (Attension Engineers) नावाच्या व्यक्तींना नियुक्त करतात जे जुगारातील तत्वांचा अधार घेऊन ही समाज माध...