Skip to main content

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन


प्रारंभिक परिचय

             भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे.

शिक्षण 

           डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली. 

हरित क्रांतीची गरज का पडली ? 

१). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६४-६५ आणि १९६५-६६ मध्ये भारताने दोन गंभीर दुष्काळ अनुभवले ज्यामुळे देशाच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये अन्नाची कमतरता पडली.

२). आर्थिक अडचणी :- अल्पभूधारक शेतकर्‍यांना सरकार आणि बँकांकडून किफायतशीर व्याजदराने कर्ज पुरवठा मिळणे खूप कठीण होते आणि म्हणून ते खासगी किंवा सावकारांकडून कर्ज घेत असत. काही शेतकऱ्यांनी जमीनदारांकडून कर्ज घेतले, कर्ज देणाऱ्या जमीनदारांनी जास्त व्याज आकारले आणि कर्जाची वेळत परतफेड न झाल्याने जमीनदारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या व त्या शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण केले गेले. 

३). कमी उत्पादकता :- भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या, शेतीच्या पारंपारिक पद्धती आणि सततचे दुष्काळ, पिकांचे पारंपारिक वाण यामुळे कृषी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. १९६० च्या दशकापर्यंत, या कमी उत्पादकतेमुळे भारताला अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली जी इतर विकसनशील देशांच्या तुलनेत अधिक तीव्र होती.

डॉ स्वामिनाथन यांचे संशोधन कार्य 

                 डॉ. स्वामिनाथन यांची १९४९ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती, परंतु  नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पी‍एच.डी. केली आणि परदेशात विविध संधी असतानाही ते भारतात परतले आणि डॉ. स्वमिनाथन यांनी सेन्ट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक (ओरिसा) येथे सहाय्यक वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून आपल्या संशोधनाची सुरवात केली आणि नंतर भारतीय कृषी संशोधन संस्था येथे सहाय्यक जनुकीय शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले आणि डॉ. स्वामिनाथन यांनी सुरवातीच्या संशोधनात क्ष – किरण व गॅमा – किरण यांच्यापासून होणाऱ्या विकीरनांचे पेशींवर आणि पिकांवर होणाऱ्या बदलांचे संशोधन केले. मेक्सिको मध्ये डॉ नॉर्मन बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या ठेंगण्या व तांबेरा रोगाला कमी बळी पडणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षमता असलेल्या वाणांचे क्षेत्रीय चाचणी प्रयोग घेतले, त्यातील काही वाणांचे भारतीय वाणांपेक्षा तिपटीने उत्पादन मिळाले. 

                १९६५ च्या रब्बी हंगामात राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजने अंतर्गत देशाच्या गहू पिकवणाऱ्या विवध भागात जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड केली गेली. अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत भारताच्या वार्षिक गहू उत्पादनात क्रांती झाली. १९६७ मध्ये गव्हाचे उत्पादन दुपटीने वाढल्याने भारत प्रथमच अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे अमेरिकेतील पी.एल. ४८० अंतर्गत मागवण्यात येणाऱ्या गव्हाची आयात कमी करण्यात आली. गहू उत्पादना बरोबर फिलिपिन्समधील भाताच्या उच्च उत्पादनक्षम वाणांची भारतात व इतर आशियाई देशांत लागवड करून भाताच्या उत्पादन वाढीतही योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवासिक बासमती तांदळाचे उच्च उत्पादनक्षम व दर्जेदार ‘पुसा बासमती’ हे वाण विकसित करण्यात आले.

            भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६८ मध्ये पुसा संशोधन केंद्राला भेट देऊन शास्त्रज्ञांचे आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. त्याच कार्यक्रमात इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, “डॉ स्वामिनाथन हे अलौकिक क्षमतेचे शास्त्रज्ञ व मुत्सदी आहेत, ज्यांनी भूक्मुक्तीच फक्त घडवून आणली नाही तर देशाला कृषीशक्तीत रुपांतरीत केले आहे.

डॉ स्वामिनाथन यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार :- 

१). भारत सरकार तर्फे १९६७ साली पद्मश्री, पद्मभूषण (१९७२), व पद्मविभूषण (१९८९).

२). फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांचा ‘गोल्डन हार्ट’ पुरस्कार आणि जागतिक अन्न पुरस्कार (१९८७).

३). नेदरलँड्सचा ‘कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क’ पुरस्कार (१९९०)

४). चार्ल्स डार्विन आंतरराष्ट्रीय शास्त्र व पर्यावरण पुरस्कार (१९९३)

५). संयुक्त राष्ट्र संघटनेचा ‘सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ (१९९४) 

६). युनेस्को गांधी सुवर्णपदक (१९९९)

७). शांती, नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार (१९९९)

८). ‘फ्रान्कलीन डी रुझवेल्ट स्वातंत्र’ पुरस्कार (२०००)

९). फ्रान्सचा ‘कमांडर ऑफ एग्रीकॉल मेरीट’ पुरस्कार (२००६). 

              भारताचे खरे रत्न व भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी भारताला आणि भारतातील लोकांना १९७० च्या दशकात दुष्काळामुळे होणाऱ्या लाखो भुकबळीपासून वाचवण्याचे आणि अन्नधान्य उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण करण्याचे मोलाचे योगदान दिले, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील लोकांच्या भुकमुक्तीसाठी अर्पण केले. 

Comments

Popular posts from this blog

ध्यान म्हणजे काय ? (What is Meditation?)

  ध्यान (Meditation)       ध्यान म्हणजे काय? (What is Meditation?)                     ध्यान ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. यात श्वासावर, मंत्रावर, किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. ध्यान हे एक प्राचीन साधन आहे जे शांतता, आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाते.  ध्यानाचा इतिहास (History of Meditation)                     ध्यानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सिंधु घाटी सभ्यता (Indus Valley Civilization) मध्ये ध्यान करणाऱ्या लोकांच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन भारतात, वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यान आणि मनःशांती यांचा उल्लेख आहे.                  बौद्ध धर्माचा उदय ध्यान परंपरेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. गौतम बुद्ध यांनी ध्यानाद्वारे बोध प्राप्त केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना ध्यान शिकवले. बौद्ध धर्मात...

शाश्वत शेती: पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी टिकाऊ मार्ग

        शाश्वत शेती    आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते . या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत -  शाश्वत शेती म्हणजे काय ?  शाश्वत शेतीचे प्रकार  भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ? शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी  शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय  1. शाश्वत शेती म्हणजे काय ?            शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते....

स्वामीनाथन आयोग: भारतीय शेतीसाठी एक क्रांतिकारी दृष्टीकोन

स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि -                 २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ,  भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी:                आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी  हमी भाव ( MSP) -     हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५

 कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...