Skip to main content

समाज माध्यमांचा विळखा आणि आपण Quit Social Media


Quit Social Media
Why Quit Social Media ?

समाज माध्यमांचा विळखा आणि आपण

                आजच्या जगात, समाज माध्यमांनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे, मग ते २ वर्षांचे मूल असो किंवा ६० वर्षांचा वृद्ध व्यक्ती. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ज्याशिवाय लोक आपला दिवस घालवू शकत नाही. एखादे मूल रडत असले तरी, रडणे थांबवण्यासाठी कोणीतरी त्यांना मजेदार व्हिडिओ मोबाईल वर लावून देतो. मग, समाज माध्यम म्हणजे काय ? हे विविध तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे जे जगभरातील लोकांना माहिती, कल्पना आणि निर्मिती सामायिक करण्यात मदत करते. पण मग प्रश्न पडतो की त्याचे अनेक फायदे असले तरी ते लोकांच्या आरोग्यासाठी चांगले आहे का ? आणि त्याचे व्यसन लोकांना कसे लागत आहे ? हे आपण या लेखातून पाहणार आहोत. 

                   लोकांना मोबाईल स्क्रीनशी खिळवून ठेवण्यासाठी अनेक मोठ मोठ्या समाज माध्यम कंपन्या लक्ष अभियंता (Attension Engineers) नावाच्या व्यक्तींना नियुक्त करतात जे जुगारातील तत्वांचा अधार घेऊन ही समाज माध्यमे शक्य तितकी व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करतात, या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी ते अश्या पद्धतीने बनवले जातात की तुम्ही ते व्यसनाधीन मार्गाने वापर करता आणि ते तुमचे पूर्ण लक्ष वेधून घेते यातूनच ते तुमचा डेटा मिळवतात आणि त्यातून नफा कमावतात. 

                लोकांचे लक्ष हे संकेतस्थळावरील बातमीवर वेधून घेण्यासाठी संकेतस्थळे अधिकाधिक कार्यक्षम आणि आकर्षक बनवली गेली आहेत. जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त वेळ त्या ठराविक संकेतस्थळावर किंवा समाज माध्यमांवर खर्च करावा आणि त्यातून या कंपन्या संकेतस्थळावरील अनावश्यक जाहिरातींमधून आर्थिक फायदा कमावतात. तुम्हाला ते कळत नाही पण तुम्हाला समाज माध्यमाची साधने व्यसनाधीन करण्यासाठी तयार केली जात आहेत. या साधनांची वास्तविक रचना हेतू असा आहे की ही साधने तुम्ही तुमच्या जागृत आणि कामच्या वेळेत तुमची एकाग्रता विचलित करतात आणि तुम्हाला त्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. 

              समोर आलेल्या संशोधनानुसार असे समजते की जर तुम्ही तुमच्या दिवसाचा मोठा भाग मोबाईल वर आलेल्या नोटीफीकेशन तपासण्यासाठी झटपट एक नजर टाकण्यासाठी तुम्ही तुमचे काम किंवा अभ्यास बाजूला ठेवून व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर एक्स, युट्यूब, थ्रेड, फेसबुक हे वापरत असाल तर यामुळे तुमचे लक्ष विचलित होते, आणि तुमची एका ठिकाणी जास्त वेळ लक्ष देण्याची क्षमता, एकाग्रता कायमची कमी होऊ शकते. जेव्हा आपण या तंत्रज्ञानात सर्वात जास्त संतृप्त असलेल्या तरुण पिढीकडे पाहतो तेव्हा याची काळजी करण्याची गरज वाटते, परंतु आताच्या काळात फक्त तरुणच नाही तर लहान बालके, मुले, आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा या तंत्रज्ञानात आकंठ बुडालेले आपल्याला आढळून येतील. जर आपण मोबाईल बाजूला ठेवून सभोवताली पाहिले तर हे भयानक दृश्य आपल्याला ही दिसेल ?      

Quit Social Media

                     समाज माध्यमं ही तंत्रज्ञानापेक्षा “मानसशास्त्र” आणि “समाजशास्त्राबद्दल” अधिक आहेत कारण ती आपल्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहेत. लोक स्वतःमध्ये सर्वोत्तम शोधण्याऐवजी ते स्वतःची तुलना काहीशा बनावट जीवनाशी करतात. जे इतर लोक सोशल मीडियावर प्रदर्शित करतात. सध्याच्या काळात तरुण पिढीमध्ये “सेल्फायटीस” नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या लक्षणाचा खूप प्रसार झाला आहे, यालाच सेल्फी सिंड्रोम असेही म्हटले जाते. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक गोष्ट समाज माध्यमांवर टाकण्याचे व्यसन लागले आहे. मग ते खासगी आयुष्यातील क्षण सुध्दा काहीजण समाज माध्यमांवर टाकून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात, किंवा एखादी वाईट गोष्ट त्यांच्याबरोबर घडली तर ते त्यातून सहानुभूती मिळवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करतात. यातूनच अनेक लोकांना त्यांचं खासगी आयुष्य हे समाज माध्यमांवर जगण्याची सवय लागली आहे. Quit Social Media

           इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची आम्हाला खरोखर काळजी आहे, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर स्वतःचा एक नवीन प्रोफाइल फोटो अपलोड करता तेव्हा तुम्हाला इतर लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यास तुम्ही आतुर झालेले असता. लोक तुमच्या नवीन प्रोफाइल फोटोबद्दल काय विचार करतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे असते. जर तुमच्या फोटोवर कोणी नकारात्मक मत मांडले तर तुम्ही निराश होता, आणि जेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइल फोटोला नवीन पसंती मिळतात तेंव्हा तुम्ही आनंदित होता म्हणजे तुमचा फोटो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही समोरच्या अनोळख्या व्यक्तीला देता यातूनच बरयाच वेळा काही लोकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते आणि ते स्वतःच्या दिसण्याचा द्वेष करू लागतात. काही जन समाज माध्यमावर सुंदर दिसण्यासाठी मेकअप, आणि वेगवेगळ्या फिल्टर्सचा वापर करतात. यातून स्वतःची खरी ओळख लपवून एक आभासी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.  'समाज माध्यमांचा विळखा आणि आपण'

Quit Social Media
Quit Social Media 

                   समाज माध्यमांमुळे लोकांच्या शारीरिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे कारण ते त्यांच्या मोबाईल वर बराच वेळ बसतात ज्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल मर्यादित होते. स्क्रीनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांना होणारे नुकसान देखील वाढते. एकाच परिवारातील लोकांचा संवाद कसा कमी झाला आहे हे सांगायला नको. जसे आपल्याला माहित आहे की मानव हा सामाजिक प्राणी आहे त्यांने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे कारण जर त्यांने तसे केले नाही तर यामुळे विविध मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

               समाज माध्यमं विनामूल्य आहेत कारण तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ त्यासाठी खर्च करता. शेवटच्या मुद्द्यावर, मी असे म्हणू इच्छितो की मी असे सुचवत नाही की आपण समाज माध्यमांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, त्याऐवजी आपण त्याचा वापर काही प्रमाणात मर्यादित केला पाहिजे आणि निरोगी भविष्यासाठी आपल्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले पाहिजे कारण तुम्ही एखद्या वस्तूसाठी किंमत मोजत नसाल तर खात्री करा कि तुम्हाला कोणी त्यांच्या फायद्याची वस्तू तर बनवलं नाही ना.





Comments

Popular posts from this blog

ध्यान म्हणजे काय ? (What is Meditation?)

  ध्यान (Meditation)       ध्यान म्हणजे काय? (What is Meditation?)                     ध्यान ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. यात श्वासावर, मंत्रावर, किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. ध्यान हे एक प्राचीन साधन आहे जे शांतता, आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाते.  ध्यानाचा इतिहास (History of Meditation)                     ध्यानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सिंधु घाटी सभ्यता (Indus Valley Civilization) मध्ये ध्यान करणाऱ्या लोकांच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन भारतात, वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यान आणि मनःशांती यांचा उल्लेख आहे.                  बौद्ध धर्माचा उदय ध्यान परंपरेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. गौतम बुद्ध यांनी ध्यानाद्वारे बोध प्राप्त केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना ध्यान शिकवले. बौद्ध धर्मात...

शाश्वत शेती: पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी टिकाऊ मार्ग

        शाश्वत शेती    आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते . या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत -  शाश्वत शेती म्हणजे काय ?  शाश्वत शेतीचे प्रकार  भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ? शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी  शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय  1. शाश्वत शेती म्हणजे काय ?            शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते....

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन

प्रारंभिक परिचय               भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे. शिक्षण             डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.  हरित क्रांतीची गरज का पडली ?  १). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६...

स्वामीनाथन आयोग: भारतीय शेतीसाठी एक क्रांतिकारी दृष्टीकोन

स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि -                 २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ,  भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी:                आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी  हमी भाव ( MSP) -     हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५

 कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...