Skip to main content

ब्रेन रॉट: डिजिटल युगातील एक मोठा धोका

 ब्रेन रॉट: डिजिटल युगातील एक मोठा धोका

Brian Rot

Brain Rot

ब्रेन रॉट हा २०२४ वर्षाचा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ दि इयर म्हणून घोषित करण्यात आला, या लेखात आपण ब्रेन रॉट या वर्ड ऑफ दि इयर या शब्दा बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या डीजीटल युगात, आपण सर्वच ऑनलाईन माहितीचा वापर करत आहोत. सोशल मिडिया, वेबसाईट, आणि इतर ऑनलाईन माध्यमांवरून आपण असंख्य प्रकारची माहिती पाहतो, वाचतो, तासंतास रील्स बघत बसतो. आणि या सर्व आपण पाहत असलेल्या माहिती मध्ये खूप कमी अशी माहिती असते जी आपल्या उपयोगाची असते आणि इतर माहिती खुप कमी दर्जाची आणि चुकीची असते किंवा आपला वेळ वाया घालवणारी असते.

ब्रेन रॉट म्हणजे नक्की काय ?

      ब्रेन रॉट हा एक अनौपचारिक शब्द आहे, जो याचा अर्थ दर्शवतो कि आपण जेंव्हा कमी दर्जाची माहिती मोबाईलवर पाहतो, वाचतो किंवा तासंतास रील्स स्क्रोल करणे टीव्ही वरील अर्थ हीन बातम्या पाहणे यामुळे आपल्या मेंदूला नुकसान होते. यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत.

ब्रेन रॉट शब्दाचा इतिहास –

      ब्रेन रॉट हा शब्द आजकाल सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानसिक आणि बौद्धिक नुकसानाला सूचित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द नवीन नाही. या शब्दचा वापर पहिल्यांदा १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी आपल्यावॉल्डन” या पुस्तकात केला होता. त्यांनी या शब्दाचा वापर मानसिक आणि बौद्धिक प्रयत्नांमध्ये सामान्य घट होण्यासाठी केला होता. त्यांच्या काळात, हा शब्द अधिक व्यापक अर्थ घेऊन होता आणि तो आजच्या अर्थापेक्षा थोडा वेगळा होता.

      आधुनिक वापरामध्ये आजकाल हा शब्द विशेषतः सोशल मिडिया आणि मोबाईलच्या अतिवापराशी संबधित आहे. जेंव्हा आपण तासंतास निरर्थक विडीओ पाहतो, स्क्रोल करत राहतो, एकसारख्या आणि कमी कालावधीच्या विडीओ बघत राहतो, तेंव्हा आपला मेंदू विचार करण्याची क्षमता गमावू लागतो. आजच्या काळात सोशल मिडिया आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. परंतु त्याचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्याला धोकादायक ठरत आहे. ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या विसरल्यासारख्या होतात, सोशल मिडीयावरील निरर्थक विडीओ, फेक न्यूज, आणि सतत बदलणारी माहिती आपल्या मेंदूला गोंधळात टाकते आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, यालाच ब्रेन रॉट म्हणतात.

ब्रेन रॉट धोकादायक का आहे ?

१) निर्णय घेण्याची क्षमता कमी होते – निर्णय घेण्याची क्षमता कमी होण्याची काही करणे आहेत ती आपण खाली बघुयात

·        माहितीचा भडीमार – सोशल मिडीयाच्या आणि इंटरनेट च्या माध्यमातून आपल्यावर सतत नवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला कोणती माहिती महत्वाची आणि कोणती महत्वाची नाही हे ओळखण्यासा अडचणी येतात.

·        ध्यान केंद्रित करण्याची क्षमता कमी होते – युट्युब आणि इंन्सटाग्राम वरील कमी कालावधीच्या विडीओ आणि रील्स पाहून आपल्या मेंदूला एका जागेवर लक्ष केंद्रित करण्याची सवय कमी होते. त्यानुळे आपण एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ ध्यान केंद्रित करू शकत नाही.

·        विश्लेषण करण्याची क्षमता कमी होते – एकाच प्रकारच्या गोष्टीची माहिती आपल्याला अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रकारे मिळाल्यावर आपल्या मेंदूला त्या माहितीचे विश्लेषण करणे कठीण जाते. त्यामुळे आपण फक्त वरवरची माहिती पाहतो आणि त्यावरून निर्णय घ्रतो.

·        भावनिक निर्णय – आपण सत्य माहिती ऐवजी आपण भावनिक होऊन निर्णय घेतो. आपल्याला कोणता निर्णय योग्य आहे हे समजत नाही.

२) सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे कठीण होते –

·         माहितीचा भडीमार आजकाल आपल्या मेंदूवर सतत नवनवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला योग्य माहिती कोणती हे ओळखण्यास अडचण येते, या मुळे अनेकदा आपला मेंदू चुकीच्या माहितीला सत्य समजू लागतो.

·         स्रोताची विश्वासार्हता – अनेक वेळा सोशल मिडीयावर चुकीची माहिती पसरवली जाते, आणि आपण त्या माहितीची सत्यता न पडताळताच आपण ती माहिती सत्य मानून पुढे पाठवतो. आणि आपण अशी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो कि जी आपल्या पूर्वग्रहाला बळकटी देईल, यामुळे सत्य माहिती कडे दुर्लक्ष होते.

·         फेक न्युज – सोशल मिडीयावर फेक न्युज चा प्रसार खूप वेगाने होतो. ही फेक न्युज खूपच वास्तविक वाटू शकते आणि आपण सत्य मानून घ्रतो.

३) मानसिक स्वास्थ्यावर परिणाम –

·         तणाव आणि चिंता – सततच्या अपडेट, लाईक्स, आणि कमेंट्स ची अपेक्षा असणे तणाव आणि चिंता वाढवू शकते.

·         एकटेपणा – सोशल मिडीयावर असंख्य मित्र असूनही, खरोखरच्या नातेसंबंधाची कमतरता जाणवू शकते.

·         नैराश्य – सोशल मिडीयावरील लोकांचे परिपूर्ण जीवन, सुंदर फोटो पाहून लोकांना असुरक्षित वाटते आणि त्यतून नैराश्य येते.

·         निंदा – निद्रानाश – आत्महत्या – या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संबधित आहेत सोशल मिडीयावरील ट्रोलिंग आणि निंदा ही एक सामान्य गोष्ट बनली आहे, जी मानसिक स्वास्थ्याला खूप हानिकारक आहे. निद्रानाश संबंधी रात्री उशीर पर्यंत मोबाईल चा वापर केला तर झोपेच्या चक्रात बदल होऊ शकतो. काही अभ्य्साकांच्या मतानुसार सोशल मिडीयावरील ट्रोलिंग मुळे लोक आत्महत्या करण्यास ही प्रवृत्त होतात.

ब्रेन रॉट टाळण्यासाठी उपयोजना – ब्रेन रॉट टाळण्यासाठी आपण अनेक उपययोजना करू शकतो. सोशल मिडीयाचा अतिवापर आणि निरर्थक माहितीच्या संपर्कात येणे हे ब्रेन रॉट चे मुख्य कारण आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खालील उपायांच्या अंमलबजावणी करून आपण ब्रेन रॉट पासून वाचू शकतो.

·         डिजिटल डिटॉक्स म्हणजे वेळोवेळी डिजिटल डिव्हाईस (स्मार्टफोन, हेडफोन, स्मार्टवॉच टॅब्लेट) पासून स्वतःला दूर ठेवा.

·         नियमित व्ययाम किंवा कोणतीही शारीरिक क्रिया मानसिक आरोग्य सुधारू शकते.

·         नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.

·         पुस्तके वाचून आपण आपल्या मेंदूला सकारात्मक माहिती देऊ शकतो.

·         नवीन कौशल्य शिकून आपल्या मेंदूला सक्रीय ठेवू शकतो.

·         मित्रांसोबत, परिवारासोबत वेळ घालवून आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

·         सोशल मिडीयाच वापर दिवसातून काही विशिष्ट वेळेपुरता मर्यादित ठेवा

·         नकारात्मक आणि हिंसक गोष्टी पाहण्यापासून स्वतःचा बचाव करावा.

·         इतर लोकांच्या जीवनाशी आपली तुलना करणे बंद करावे.

·         सोशल मिडिया ऐवजी वास्तविक जीवनातील नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करावे.

   ब्रेन रॉट टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्हाला मानसिक आरोग्याची समस्या आहे, तर कृपया मदत मागण्यास संकोच करू नका. तुमचे मानसिक आरोग्य तुमच्या हातात आहे, त्याची काळजी घ्या.


Comments

Popular posts from this blog

ध्यान म्हणजे काय ? (What is Meditation?)

  ध्यान (Meditation)       ध्यान म्हणजे काय? (What is Meditation?)                     ध्यान ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. यात श्वासावर, मंत्रावर, किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. ध्यान हे एक प्राचीन साधन आहे जे शांतता, आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाते.  ध्यानाचा इतिहास (History of Meditation)                     ध्यानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सिंधु घाटी सभ्यता (Indus Valley Civilization) मध्ये ध्यान करणाऱ्या लोकांच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन भारतात, वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यान आणि मनःशांती यांचा उल्लेख आहे.                  बौद्ध धर्माचा उदय ध्यान परंपरेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. गौतम बुद्ध यांनी ध्यानाद्वारे बोध प्राप्त केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना ध्यान शिकवले. बौद्ध धर्मात...

शाश्वत शेती: पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी टिकाऊ मार्ग

        शाश्वत शेती    आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते . या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत -  शाश्वत शेती म्हणजे काय ?  शाश्वत शेतीचे प्रकार  भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ? शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी  शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय  1. शाश्वत शेती म्हणजे काय ?            शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते....

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन

प्रारंभिक परिचय               भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे. शिक्षण             डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.  हरित क्रांतीची गरज का पडली ?  १). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६...

स्वामीनाथन आयोग: भारतीय शेतीसाठी एक क्रांतिकारी दृष्टीकोन

स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि -                 २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ,  भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी:                आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी  हमी भाव ( MSP) -     हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५

 कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...