Skip to main content

खेडी समृद्ध झाली का ?

 खेडी समृद्ध झाली का ?

खेडी समृद्ध झाली का
खेडी समृद्ध झाली का

खरा भारत गावागावात खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून गांधीजीनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. त्यांनी खेड्याकडे चला असे आवाहन करून खेड्यांना देशाच्या विकासाचे केंद्र बनवण्याचे स्वप्न पहिले होते. गांधीजींच्या मते, खेडे हे भारताचे डोके आहे. खेड्यांचा विकास करूनच देशाचा सर्वांगीण विकस होऊ शकतो. स्वदेशी, खादी आणि ग्रामोद्योग या संकल्पनांवर भर देऊन खेड्यांमध्ये उद्योगधंदे सुरु करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हा त्यांच्या घोषणे मागील उद्देश होता.

      आज इतक्या वर्षानंतरही आपण गांधीजींच्या स्वप्नातील खेडी साकारण्यात यशस्वी झालो आहे का आणि आपल्या मनात हा प्रश्न किती वेळा पडतो याचा विचार तरी मनात कधी येतो का ? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. फक्त घोषणा देऊन आणि संसद आदर्श ग्राम योजना जाहीर करून खेडी समृद्ध होणार आहेत का ?

      या लेखात आपण खेड्यातील शेतीसमोरील आणि तरुणांसामोरील आव्हाह्नांचा उहापोह करणार आहोत.

१)     शेतीसामोरील आव्हाने

     भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि सर्वात जास्त रोजगार उपलब्धता याच क्षेत्रातून होते. मग शेती प्रधान देशातील शेतकरी संकटात का आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ दुप्पट करण्याची घोषणा २०१६ मध्ये केली होती परंतु या योजनेला ८ वर्ष पूर्ण होऊनही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का ? हा मोठा प्रश्न आहे.

  शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा – शेतकरी शेतीच्या, व घर खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी विविध बँक, पथसंस्था, विकस सोसायटी, खासगी फायनान्स, सावकार यांच्याकडून कर्जाऊ रक्कम घेऊन आपले काम पार पडतो आणि ती कर्जफेड शेतात उभ्या असलेल्या पिकावर करतो, परंतु दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अश्या नैसर्गिक घटनांमुळे त्याचे पिक पूर्णपणे नष्ट होऊन तो कर्जाच्या बोज्यात आणि त्याच्या व्याजाच्या ढिगाऱ्या खाली दबून जातो.

    खत दुकानदारांची उदारी – शेतातील पिक चांगले येऊन आपल्यावरचा कर्जाचा डोंगर कमी व्हावा या आशेने शेतकरी आपल्या पिकाच्या दमदार वाढीसाठी खत व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबतो परंतु तिथेही त्याच्या हाती निराशाच येते कारण सरकारने शेतकरयाचे उत्पन्न दुप्पट करण्याएवजी खतांच्या किमती दुप्पट केल्या आहेत. बाजारात नकली खतांचा सुळसुळाट झाला आहे आणि किमती भरमसाठ त्यामुळे पिकांना जी मुलभूत अन्नद्रव्ये मिळायची ती मिळत नाहीत परंतु यातून नकली कंपन्या आणि खत दुकानदार यांना भरपूर फायदा होत आहे. आणि कृषी विभाग कारवाई सोडून खतांच्या लिकिंग वर फक्त मार्गदर्शक सूचना काढत बसलेला दिसतो.

    शेतीचा वीजपुरवठा – वीज ही शेतीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे परंतु आपले सरकार स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर ही शेतीसाठी दिवसा भारनियम मुक्त वीजपुरवठा देण्यात अयशस्वी ठरले आहे. आज कित्येक गावांमध्ये शेतीसाठी वीजपुरवठा हा रात्रीचा दिला जातो तो म्हणजे रात्री १२ ते सकाळी ८. रात्री थंडी, साप, हिस्त्र प्राणी यांचा सामना करत शेतीला पाणी पुरवठा करवा लागतो. आज आपण विश्वगुरु च्या चर्चा करत असताना जो शेतकरी वर्ग देशाला जगवत आहे त्याच्या कडे पूर्ण पणे डोळेझाक करत आहे यासारखे दुर्दैव नाही आणि आपण विश्वगुरु म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का याचा विचार केला पाहिजे.

२)          तरुणांची बिकट अवस्था –

   बेरोजगारीचे भयाण वास्तव - सेंटर फॉर मॉंनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर ८.१ टक्क्यांवर पोहचला होता. संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२४ – २५ मध्ये नमूद केले आहे कि भारताला २०३० पर्यत दरवर्षी सरासरी ७.८५ दशलक्ष बिगरशेती नोकऱ्या निर्माण करणे आर्थिक वृद्धीसाठी महत्वाचे आहे. परंतु तसे होताना आपल्या देशात दिसत नाही, डिसेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १.५ लाख सरकारी नोकर भरती १०० दिवसात पूर्ण करणार असे वचन दिले पण त्या गोष्टीला आज २ महिने पूर्ण होत आले परंतु अजून काहीच हलचाल होताना दिसत नाही. राज्यातील कृषी विद्यापीठे ३० ते ३५ टक्के मनुष्यबळावर कार्यरत आहेत.

  व्यसनांचा विळखा – बेरोजगारी, आर्थिक संकट, शेतीचे उत्पन्न कमी असणे यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत, खेडेगावातील ५० ते ६० टक्के तरुण हे आज दारू, गुटखा यांच्या आहारी गेले आहेत, गावागावातील तरुणांच्या मृत्यच्या मागील कारण हे दारू आणि इतर व्यसने हेच आहे.

   तरुणांच्या लग्नाचे प्रश्न – आज प्रत्येक गावात लोकसंखेनुसार गावातील १०० तरुणांमधील ६० ते ७० तरुण हे बिनलग्नाचे आहेत, आणि त्याचे कारण हे बेरोजगारी आहे. कारण मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत कि त्यामुळे अनेक गरीब तरुणांवर बिना लग्नाचे राहण्याची वेळ आलेली आहे. या गोष्टींकडे सरकार कधी लक्ष देणार हे सरकारलाच माहित.

     विकास कामंचा वानवा – आज अनेक खेडेगावातील विकास कामांचा आढावा घेतला तर आपल्याला तिथे काहीच दिसणार नाही, विकासाच्या नावाखाली जो निधी येतो तो निधी मध्येच गायब होतो, साधा १ किलोमीटरचा डांबरी रस्ता २ ते ३ टप्यात केला जातो तो ही अपूर्ण च राहतो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गाव एक खासदार मोहीम २०१४ रोजी सुरु केली त्यानुसार २०१६ पर्यत आदर्श गाव तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते, परंतु दत्तक घेतलेली गावे आज १० वर्ष झाली अजून विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. यातूनच राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचे दर्शन घडते.  

आज खेड्यांची अवस्था बघून राजकिय लोकांना एकच सांगावेसे वाटते आता तरी खेड्यांकडे बघा, आपल्या राष्ट्रपित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.

Comments

Popular posts from this blog

ध्यान म्हणजे काय ? (What is Meditation?)

  ध्यान (Meditation)       ध्यान म्हणजे काय? (What is Meditation?)                     ध्यान ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केला जातो. यात श्वासावर, मंत्रावर, किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. ध्यान हे एक प्राचीन साधन आहे जे शांतता, आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाते.  ध्यानाचा इतिहास (History of Meditation)                     ध्यानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सिंधु घाटी सभ्यता (Indus Valley Civilization) मध्ये ध्यान करणाऱ्या लोकांच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्राचीन भारतात, वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यान आणि मनःशांती यांचा उल्लेख आहे.                  बौद्ध धर्माचा उदय ध्यान परंपरेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. गौतम बुद्ध यांनी ध्यानाद्वारे बोध प्राप्त केला आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना ध्यान शिकवले. बौद्ध धर्मात...

शाश्वत शेती: पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी टिकाऊ मार्ग

        शाश्वत शेती    आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते . या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत -  शाश्वत शेती म्हणजे काय ?  शाश्वत शेतीचे प्रकार  भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ? शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी  शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय  1. शाश्वत शेती म्हणजे काय ?            शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते....

भारतीय हरतिक्रांतीचे जनक - डॉ. एम. एस. स्वामिनाथन

प्रारंभिक परिचय               भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे. शिक्षण             डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.  हरित क्रांतीची गरज का पडली ?  १). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६...

स्वामीनाथन आयोग: भारतीय शेतीसाठी एक क्रांतिकारी दृष्टीकोन

स्वामीनाथन आयोग समितीची पार्श्वभूमि -                 २००२ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत होते. कमी उत्पादकता , कर्जात बुडालेले शेतकरी , आणि ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर या काही प्रमुख समस्या होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी , तत्कालीन सरकारने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ,  भारतीय शेतीचे भविष्य घडवण्यासाठी व्यापक शिफारसी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. प्रमुख शिफारसी:                आयोगाने 2006 मध्ये आपला अहवाल सादर केला , ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिफारसींचा समावेश होता. त्यापैकी काही प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे - १) शेतकऱ्यांसाठी  हमी भाव ( MSP) -     हमी भाव ( MSP) हा भारतीय सरकारकडून निश्चित केलेला किमान किंमत आहे ज्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे पीक खरेदी केले जाईल. स्वामीनाथन आयोग यांनी MSP मध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवले , ज्याचा शेतकऱ्यांव...

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

बियाणे राज्यात खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. पाऊस चांगला झाला तर जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. पेरणीकरिता शेतकरी बियाणे व खत खरेदी करीत आहेत. अनेकदा बोगस बियाणे बाजारात येतात व बियाणे उगवत नसल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बियाणे व खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एमआरपी एवढेच पैसे द्या! पेरणीसाठी लागणारे कृषी साहित्य तसेच अन्य वेळीही दुकानातून कृषी व्यवसायाशी संबंधित साहित्य खरेदी करताना एमआरपी बघणे आवश्यक असते. जेवढी एमआरपी आहे तेवढीच रक्कम दुकानदाराला द्यावी. दुकानदार जाणीवपूर्वक एखाद्या खताचा तुटवडा निर्माण करतात व एमआरपी पेक्षा जास्त दरात विक्री करतात. शेतकऱ्यांनी त्यावेळी संबंधित खताची जास्त गरज असल्याने शेतकरी जास्त पैसे देऊनही खताची खरेदी करतात. मात्र, शेतकऱ्यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नयेत परंतु तसे आढळून आल्यास कृषी विभागाकडे त्या दुकानदाराची तक्रार करावी. खते व बी बियाणे विक्रेत्याकडून पक्के बिल का घ्यावे ? बियाणे व खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बि...

कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५

 कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...

हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्हाने

हवामान बदल आणि शेती                 हवामान बदलामुळे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर कृषी, अन्नपुरवठा व अन्नसुरक्षा यावर अलीकडील काळात विपरीत परिणाम दिसून येत आहेत. तापमानात होणारी वाढ, मॉन्सून च्या आगमनात झालेले बदल, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ या सर्व गोष्टींचा परिणाम शेतीवर प्रकर्षाने जाणवत आहे. यावर्षी २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.                 मागील काही दिवसांमध्ये कृषी मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार गहु उत्पादनामध्ये ३ % ची घट झाली आहे. व ही उत्पादन घट २०१४ - १५ नंतरची पहिली घट आहे व या उत्पादनातील घटीसाठी उष्ण हवामान जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.            या वर्षीच्या उन्हाळ्यात विदर्भाचा संत्रा उत्पादक भाग ही अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे संकटात सापडला, या भागातील तापमान हे ४५ ℃ च्या वर पोहचल्यामुळे शेतकऱ्यांनी धरलेल्या अंबिया बहराची फळ...